पुणे शहरातील पिंपरी चिंचवड विभागात नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकवेळा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चिंचवड गावातील शांतीबन सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकावर झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ह्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असून, पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई करत आरोपीस अटक केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये नेमकी घटना काय घडली?
शांतीबन सोसायटीमध्ये सुदाम कामेठे हे सुरक्षारक्षक म्हणून गेटवर ड्युटीवर होते. आरोपी राम लोंढे, जो पूर्वी ह्याच सोसायटीत हाउसकीपिंगचे काम करायचा, तो अचानक सोसायटीच्या गेटवर आला. सुरक्षारक्षक सुदाम कामेठे ह्यांनी त्याला आत का येत आहे, याबद्दल विचारणा केली. काही वेळ दोघांमध्ये वाद झाला. अचानक राम लोंढेने चाकू काढून सुरक्षारक्षकावर हल्ला केला. सुदाम कामेठे यांनी बचावासाठी टेबलवरील वीट उचलून प्रतिकार केला. मात्र, आरोपीने ती वीट हिसकावून घेतली आणि त्याच विटेने सुरक्षारक्षकाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
जीवघेणा हल्ल्याचे कारण
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आरोपी राम लोंढे याला व्यसनाधीनतेमुळे काही दिवसांपूर्वीच नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. ह्याच संतापातून त्याने हा हल्ला केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आरोपीने पूर्वीच्या रागातून सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला केला. सुदाम कामेठे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पोलिसांची त्वरित कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी राम लोंढे याला अटक केली. पुढील तपास सुरू असून, आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. ह्या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पुण्यातील वाढती गुन्हेगारी – एक चिंतेचा विषय
पुणे हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक नगरी म्हणून ओळखले जाते. मात्र, मागील काही वर्षांत येथे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, पुणे शहरात सुमारे ३८ हजार गुन्हेगार वास्तव्यास आहेत. त्यापैकी ८ ते १० हजार सराईत गुन्हेगार आहेत. २०२१ नंतर दरवर्षी सरासरी ७ ते ८ हजार गुन्हे नोंदवले जात आहेत. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
गुन्ह्यांच्या स्वरूपातही बदल झाल्याचे दिसून येते. पारंपरिक चोरी, दरोडा, खून अशा घटनांबरोबरच आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, विनयभंग, हुंडाबळी अशा घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सतर्क राहून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची गरज आहे.
समाजातील अस्थैर्य आणि सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी
या घटनेमुळे सोसायटीमध्ये आणि परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सुरक्षारक्षक हे रहिवाशांच्या सुरक्षेसाठी २४ तास ड्युटीवर असतात. त्यांच्यावरच हल्ला होणे, हे गंभीर बाब आहे. सोसायटी व्यवस्थापनाने आणि पोलिस प्रशासनाने सुरक्षारक्षकांसाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
https://www.instagram.com/policernews